Supreme Court On Vanatara: मित्रांनो, मागील महिन्यामध्ये कोल्हापूर आणि कोल्हापुरातील हत्तींनी मोठ्या चर्चेचा विषय बनली होती. कारण तेथील सर्वांच्या जिवाभावाच्या माधुरी नावाच्या हत्तीणीला अनंत अंबानींच्या वनतारा मध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूर वासियांकडून जोरदार विरोध अनंत अंबानी यांचा झाला.
एवढेच नाहीत तर महाराष्ट्रभर याचे पडसाद सुद्धा दिसू लागलेत. कोल्हापूरवासियांनी तर जीओ चे सिमकार्डच वापरणे बंद केले आणि इतर कंपनीचे सिम कार्ड वापरण्यास सुरुवात केली हाती. अर्थातच जिओ कंपनीचा बहिष्कारच करण्यात आला होता. नंतर हि केस कोर्टात गेली आणि कोर्टाने सर्वप्रथम वनताराची चौकशी करण्यासाठी एक SIT ची नेमणूक केली होती. त्या कमिटीची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर Supreme Court On Vanatara निर्णय दिला आहे. ते खालीलप्रमाणे बघुत.
Also Read: UPI Payment Refund: चुकीने तुमचे पैसे UPI मधून ट्रान्सफर झालेत का? ते परत मिळवण्यासाठी हे करा.
वनतारावर सुप्रीम कोर्टाने काय दिला निर्णय?
मित्रांनो, वनतारा हे अंबानींचे रिलायन्स फाऊंडेशन मार्फत गुजरातमधील जामनगरमध्ये जालावल्या जाणारे एक प्राणी संग्रालय आहे. ज्यामध्ये प्राणी बचाओ मोहीमेअंतर्गत देशभरातून प्राणी आणले जातात. याच वनतारा विरोधात सर्वोच न्यायालयात विविध आरोपांची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच न्यायालयाने एक SIT स्थापन केली. त्या SIT मध्ये माझी न्यायाधिशांसह मोठे माझी अधिकारुणी सुद्धा शामिल होते. हि SIT 25 आगस्ट रोजी स्थापन करण्यात आली होती.
त्यांनी चौकशी केली आणि चौकशीचा अहवाल बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच न्यायालयात हाजीर केला. तो सर्व अहवाल बघून आणि समजून न्यायालयाने वनतारा वर लागलेले सर्व आरोप बिनबुनियादी असल्याने वनताराला क्लीन चिट जाहीर केली आहे.
वनतारा वरती केले गेलेले आरोप
- वनतारा बेकायदेशीर परवान्यांची खरेदी करते.
- त्यांच्याकडे असलेल्या प्राण्यांसोबत ते गैरवर्तन करतात
- सोबतच पैशांची सुद्धा दुर्व्यवहार केले गेले आहेत.
या आरोपांचे न्यायालयाने खंडन केले
न्यायालयाने स्थापन केलेली SIT हि सर्वोच न्यायालयाचे माझी न्यायाधीश चेलमेश्वर याच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होती. या समितीने वनतारा मध्ये सतत तीन दिवस चौकशी केली. तेथील कर्मचारी आणि वरिष्ठ यांच्यासोबत संवाद साधला आणि एक अहवाल तयार केला. जो न्यायमूर्ती पंकज मिथल आणि पी.बी. वराळे याच्या खंडपीठाकडे दिला. त्यांनी हा अहवाल बघिलता आणि 15 सप्टेम्बर रोज सुनावणी घेतली.
न्यायमूर्ती मिथल आणि वराळे यांच्या खंडपीठाने वनतारा ला क्लीन चिट देत लावण्यात आलेले सर्व आरोप खंडित केले आहे. त्यांने म्हंटले कि “आम्ही गठीत केलेल्या पाच सदस्यांच्या SIT ने जो अहवाल सादर केला आहे, त्यानुसार वनतारा सर्व कायदेशीर नियमांचं योग्यरीत्या पालन करत आहे. तसेच तेथील प्राणायची योग्य सोया केली जात, त्यामुळे प्राण्यांच्या पालन पोषणात सुद्धा कुठल्याही त्रुटी आढळून आलेल्या नाहीत.
न्यायालयाचा याचिकाकर्त्यांनाच सवाल
तर त्यात चूक काय? असा सवालच सर्वोच न्यायालयाने याचिका कर्त्यांना केला आहे. एकंदरीत झाले असे कि, सुनावणीच्या वेळ याचिकाकर्त्यांकडून कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर न्याधीशांनी म्हंटले कि, त्या कोल्हापुरातील मंदिरातमधील मधुर हत्तीणीची योग्य सोय घेतली जात नाही हे तुम्हाला कशावरून कळालं?
तसेच न्यायमूर्ती हे सुद्धा म्हणाले, कि आपल्या देशात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत जे अभिमानास्पद आहेत. असल्या गोष्टी फालतू वादांमध्ये अडवता काम नये. जर एखाद्याला चांगल्या पद्धतीने हत्ती पाळायचा असेल आणि ते हि सर्व नियमांचे पालन करून कायशीर घेऊन जाळ पळत असेल, त्याची उत्तम प्रकारे देखभाल करत असेल तर यात चूक काय?
निष्कर्ष
कोल्हापुरातील एका मंदिरामधील माधुरी उर्फ महादेवी हि तेथील स्थानिक नागरिकांच्या परिवारातील एक भाग बनली होती. परंतु अनंत अंबानींच्या वांटारा मध्ये तिला नेण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली. मात्र आता सर्वोच न्यायालयाने वनतारा कायदेशीरकं करत असल्याने क्लीन चिट देण्यात आली आहे. याचा अर्थ असाच कि आता माधुरी पार्ट येऊ शकणार नाही, हाच घेता येईल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More